दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी कही देवास्थानाच्या पुढाकरानांतर काही बड्या उद्योजकांनी मदतीसाठी पुढे केलेला हात प्रशंसनीय आहे. त्याचे अनुकरण इतर कंपन्यांनी केले तर सोन्याहून पिवळे. अशा दुष्काळ परिस्थितीत IPL मध्ये पैशाची होत असलेली प्रचंड नासाडी पहावत नाही. संघ मालकाच्यात तर पैसे उधळण्याची जणु स्पर्धाच लागली आहे. खेळाडुंवर तर रेसच्या घोड्या सारखे पैसे लावले जात आहेत. वरुन हे खेळाडू ही जमवलेली माया पाठवणार आपल्या मायदेशात, त्यामुळे हा पैसा परत भारतीय अर्थ व्यवस्थेत येण्याचा प्रश्नच नाही. IPL आयोजकांनी व खेळाडुंनी आपल्या 'नफ्यातला' एखादा टक्का जरी दुष्काळनिधि म्हणून दिला तरी पुरेशी मदत होईल. या IPL च्या निमित्ताने पाणी, वीज, अन्न, पैसा, इंधन यांची प्रचंड नासाड़ी चालू आहे. निदान जनाची नहीं तर मनाची म्हणून तरी त्यांनी दुष्काळनिधिस हातभार लावणे अपेक्षित आहे.